कळंब (प्रतिनिधी)- महामानवाच्या कर्तृत्वाला साजेशी जयंती साजरी व्हावी परंतु आज उत्सवाचा सार डॉल्बी बनत आहे याचे दुष्परिणामापासून वाचविण्यासाठी जागृत नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी आहे जयंती कोणत्या पद्धतीने कशी साजरी करतोय याचा विचार व्हावा जयंती उत्सवात डॉल्बी साठी अनावश्यक खर्च केला जात आहे हे अनावश्यक पैसे खर्च होत आहेत हे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावेत असे विचार पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनात संमेलनाचे उद्घाटक म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन दिनांक 11 व 12 एप्रिल रोजी संस्कृती सभागृह मेन रोड कळंब येथे संपन्न होत आहे याप्रसंगी मंचावर माजी आमदार दयानंद गायकवाड, साहित्यिक शिवानंद भानुसे, कॉ. अरुण रेणके, सर्फराज अहमद, भास्कर खोसे, महादेव महाराज अडसूळ प्राध्यापक वर्षा जाधव, प्रा मीनाक्षी शिंदे, ज्योती सपाटे , त्रिंबकराव मनगिरे , अतुल गायकवाड,यांच्यासह संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमदार कैलास दादा घाडगे पाटील कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय कांबळे, यांची उपस्थिती होती आपल्या उद्घाटनाच्या भाषणात पुढे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माणूस म्हणून एकच जात धर्म आहे माणुसकीने वागणे कर्तव्य आहे समाजात विघात कृती वाढत आहे समाजाने कृती कशासाठी केली जाते हे ओळखावे आज खरच लोकशाही आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हा नियोजन निधीचा पैसा जनतेचा आहे मी खासदार म्हणून त्याचा विश्वस्त आहे परंतु या कामात राजकारण केले जात आहे असे सांगून खासदार निंबाळकर यांनी आपण आपलं काम व नाव जपायचे काम करीत असून यासाठी कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी आहे असे सांगितले तर आपल्या स्वागत अध्यक्ष भाषणात आमदार कैलास पाटील यांनी आज कळंब शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन घेतले जात आहे हा अनोखा प्रयोग आहे यामुळे निश्चितच देशाला दिशा मिळेल असे सांगून महापुरुषांना जातीपुरते मर्यादित केले जात असून समाजा समाजात तंटे लावून राजकारणी पोळी भाजून घेत आहे संविधानाप्रमाणे काम करण्यासाठी एक संघ भारत निर्माण करण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे असे सांगितले , संमेलन अध्यक्ष , ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे दैनिक लोकसत्ता यांनी आपल्या भाषणात साहित्य म्हणजे काय असा प्रश्न विचारून साहित्यातून समाज किती बदलतो यावरून साहित्य महान आहे की निरर्थक साहित्य आहे हे समजते असे सांगून परिस्थिती बदलायची असेल तर महामानवांना जातीत वाटण्यापेक्षा महामानवाच्या विचाराचे वाटप करावे असे सांगितले तर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. संजय कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात छत्रपती. शिवाजी महाराजांना धर्माच्या विरोधात दाखविले जाते पुढील निवडणुकीत आपण पारतंत्र्यात जात जातोत की काय अशी परिस्थिती आहे या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार महत्त्वाचे आहे महामानवाच्या नावाने समाज परिवर्तन होत असते व समाज जोडला पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमात पत्रकार उन्मेश पाटील व पत्रकार अविनाश काळे यांना मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कार्यक्रमात पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले यामध्ये आंबेडकरवादी वाड;मयीन चळवळीतील शिलेदार लेखक के.व्ही. सरवदे , भर उन्हात बोलताना (वैचारिक ) कवड्या अग्नि परीक्षेचे वेळापत्रक, (समीक्षा) रमेश बोर्डेकर, सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथ संपादन प्रा .दीपक सूर्यवंशी यांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करू ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रम स्थळी नगरपरिषद संस्कृती सभागृह मेन रोड कळंब येथे पोहोचली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी तर आभार ईश्वर राठोड यांनी मांनले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग किशोर वाघमारे, सचिन तिरकर ,बंडूभाऊ तावरे, अनिल हजारे, सतपाल बनसोडे, चत्रभुज घाडगे, भास्कर सोनवणे ,विलास करंजकर , डॉ. रामकृष्ण लोंढे ,रमेश बोर्डेकर, संघरत्न कसबे ,लक्ष्मण धावारे,माधवसिंग राजपूत, सचिन क्षिरसागर, महावीर गायकवाड, प्रा. सुषमा कांबळे, प्रा.प्रतिभा भवर, अलका टोणगे,धनश्री कवडे, सलमा सौदागर,सरस्वती अडसूळ, यांनी परिश्रम घेतले