तुळजापुर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या वक्फ सुधारणा विधेयक 2025 विरोधात तुळजापुर शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने आज तीव्र आंदोलन केले. या विधेयकाच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून, मा. तहसीलदार यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

सदर विधेयक मुस्लीम समाजाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असून, संविधानातील कलम 14, 15, 25, 26 आणि 29 नुसार दिलेले धार्मिक स्वातंत्र्य व अल्पसंख्याक अधिकार धोक्यात येणार असल्याची गंभीर चिंता आंदोलकांनी व्यक्त केली.

देशभरात सुमारे 9 लाख एकर वक्फ मालमत्ता असून, ती मुस्लिम समाजाने समाजहितासाठी दान केलेली आहे. नव्या विधेयकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मालमत्तेवर सर्वस्वी अधिकार, वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ न्यायाधिकरणाचे अधिकार कमी करणे, आणि वक्फ मालमत्तेवरील सर्वे बंद करणे यासारख्या तरतुदी करून ही मालमत्ता खाजगी उद्योगपती व संस्थांकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला.

या धरणे आंदोलनास शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला. यावेळी जिल्ह्याचे नेते मसूद शेख, मुफ्ती फिरदोस, मौलाना गुलाम रजवी, हाफीज इब्राहिम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. धीरज पाटील, मा. नगरसेवक अमर मगर,  मा.नगरध्याक्ष एम.के पठाण, तौफिक शेख, शेकाप चे नेते उत्तम नाना अमृतराव, राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना (उबाठा)पक्षाचे नेते श्याम भाऊ पवार,रुबाब भाई पठाण, शरद जगदाळे, ()चे नेते संजय शितोळे, धैर्यशील कापसे, बाबासाहेब मस्के, एड. पत्रकार कुलकर्णी साहेब, युसूफ भाई शेख, हाजी जावेदसाब बागवान,  मा.नगरसेवक अफसर शेख, महेबूब पटेल, अरीफ  बागवान मतीन बागवान, रईस सिद्दिकी, इब्राहिम इनामदार, सिद्दीक पटेल, मकसूद शेख, रफीक शेख, जमीर शेख, अशपाक सय्यद, पत्रकार अहमद अंसारी, रहीम शेख, कलीम शेख, असलम तांबोळी, इमरान बागवान, आयाज पठाण, इलियास अत्तार, अझहर आत्तार, अजिज सय्यद, एड. फारुक शेख उपस्थित होते. समाजाचे भावना समजून वक्फ सुधारणा विधेयक रद्द न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असे आवाहन तौफिक शेख यांनी केले.


 
Top