तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेची चैञ पोर्णिमा दिनी सर्वाधिक भक्त शुक्रवार पेठ भागात मुक्कामी येतात. प्रशासनाने माञ या भागात कुठल्याची सोयीसुविधा उपलब्ध करुन न दिल्याने येथे भाविकांना पाणी सुध्दा विकत घेऊन तहान भागवावी लागली.
याञा नियोजनात प्रशासन या भागाचा समावेश करीत नसल्याने हा दुजाभाव कधी संपुष्टात येणार असा सवाल केला जात आहे. जिथे भाविकांची सर्वाधिक गर्दी तिथे सुविधांचा ठणठणाट, जिथे गर्दी नाही तिथे सुविधांचा पायघड्या असाहा कारभार चालु असल्याचा आरोप होत आहे. या भागातील रस्त्यावर मधोमध दुचाकी लावल्या जात असुन, अतिक्रमण येथे मोठ्या प्रमाणात आहे. या भागात साधी पाणपोईची सुविधा नाही. या भागात सतत वीज ये-जा करते.