तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीला अडीच वर्षा नंतर पुर्णवेळ अजिंक्य नन्नवरे रुपाने आठ दिवसा पुर्वी मुख्याधिकारी मिळाला माञ अतिक्रमण स्वछता पाणीपुरवठा बाबतीत जैसे थे परिस्थिती असल्याने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे अँक्शन मोडवर कधी येणार असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीला अडीच वर्षानंतर अजिंक्य रणदिवे रुपाने पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला पदभार स्विकारल्या नंतर दोन दिवस स्वागत सत्कार स्विकारण्यात गेले. त्यानंतर ते कामाला लागतील असे वाटले होते. माञ तसे काही त्यांच्या कामा बाबतीत दिसुन येत नाही. सध्या शहरात विशेषता मंदीर परिसरात असणाऱ्या शुक्रवार पेठ भागात कचराकुंड्या कच-याने कचरा अर्धा रस्तावर आला आहे. पाणी ही हिरवेसर येत आहे. पुर्वीचे प्रभारी मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांनी शहरातील रस्तावरील अतिक्रमणे हटवले होते ते पुन्हा बसले आहेत. याचा ञास भाविकांना, शहरवासियांना मंदीर समोरील भागात मंदीरात ये-जा करताना बसत आहे. मंदीराकडे येणाऱ्या तिन्ही प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणे झाले आहे. शुक्रवार पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर तर दुचाकी पार्कींग झाली आहे. अधुन मधुन हिरवेसर पाणी येत आहे. तुळजापूर नगरपरीषद परिषद मधील लेखा विभाग माञ कायमच चर्चत असतो मागील मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांनी कुण्या धनादेशावर स्वाक्षरी केल्या ते कळते. अनेकांचे धनादेश माञ महिनोमहिना मुख्याधिकारी सही नावाखाली देणे थांबवले आहे. वाहनतळ ठेका प्रक्रियेचे काय झाले हे शहरवासियांना समजेनासे झाले आहे. शहरातील गल्लीबोळातील अनेक पेव्हरब्लाँक काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शहरवासियांना मार्गक्रमण करताना याचा ञास सहन करावा लागत आहे. वसुलीत पारदर्शिकता कधी येणार असाही सवाल होत आहे. त्यामुळे नुतन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे कधी कामाला लागणार याची वाट शहरवासिय पाहत आहेत.