तुळजापूर(प्रतिनिधी)-  येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील  एन. एस. एस. विभागाच्या  विद्यार्थ्यांनी असाह्य उन्हाचा पक्षांच्या  ञासापासुन बचाव करण्यासाठी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवले आहेत.

या उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि एकूण 150 घरटी तयार केली. हा उपक्रम  प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यांनी या कार्याच्या सामाजिक व पर्यावरणीय महत्वावर भर दिला आणि पुढील काळात असे अधिक उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमास एन. एस. एस. व जिमखाना प्रमुख प्रा. सचिन सगरे व एन. एस. एस. समन्वयक प्रा. प्रसाद सुतार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, प्रा. सगरे यांनी या कार्यक्रमाचा यशस्वी अध्याय ठरल्याचे सांगत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी अविनाश लोहार व रणवीर एम. यांनी विशेष सहकार्य केले, तर महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

 
Top