नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील कदम यांच्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला असून नळदुर्ग व परिसरात ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ गेल्या दोन-तीन महिन्यात पासून सुरूच आहे. दरम्यान वन विभागातील अधिकारी यांना बिबट्यांना पकडण्यामध्ये यश येत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

तुळजापूर तालुक्यातील मुर्टा शिवारात कदम यांच्या शेतामध्ये दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये नऊ शेळ्या मरण पावले आहेत. या शेळ्या शेत असणार लक्ष्मण कोळी राहणार नळदुर्ग यांच्या असून, लक्ष्मण कोळी यांनी सकाळी शेळ्यांचा गोठा साफसफाई करून त्या शेळ्या गोठ्याच्या बाहेर बांधल्या होत्या. दरम्यान लक्ष्मण कोळी यांनी आपल्या शेळ्या गोट्याच्या बाहेर बांधून दुसऱ्या कामासाठी शेतामध्ये गेला असता सकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याने अचानक शेळ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून सुमारे एक ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची चर्चा होत आहे. 

गेल्या दोन-तीन महिन्यापासून नळदुर्ग परिसरातील ग्रामीण भागामध्ये बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा शेतकऱ्यातून होत होत्या. दरम्यान गेल्या दीड महिन्या पूर्वी याच शिवारात एका शेतकऱ्याच्या घोड्याचा प्राणही या बिबट्याने घेतला होता. त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या भीतीने वातावरण भीतीयुक्त झाले होते. दिवसेंदिवस बिबट्याचा वावर नळदुर्ग परिसरातील ग्रामीण भागामध्ये आलियाबाद शिवार, मुर्टा शिवार, नळदुर्ग परिसरात बिबट्या येत असल्याच्या चर्चा होत होत्या. यामुळे शेतकऱ्यातून भीती व्यक्त केली जात होती, दरम्यान रात्रीच्या वेळी शेतकरी शेतामध्ये आपल्या पिकास पाणी देण्यासाठी जाणे टाळत होते. या बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंता तूर झाला होता, दरम्यान आता तरी वन विभागाने या प्रकाराचा छडा लावण्यासाठी किंवा बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावावा अशी मागणी होत आहे. दरम्यान लक्ष्मण कोळी यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वन विभागाने व संबंधित प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.  


 
Top