तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ पाटील यांनी राजीनामा द्यावा व मुख्य आरोपीं विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील यांनी पञकार परिषद घेवुन केली आहे.
या वेळी पञकारांशी संवाद साधताना पाटील पुढे म्हणाले कि, तुळजापूरात अनेक वर्षा पासुन येत असुन ड्रग्जमुळे अनेकांची संसार उध्दवस्त झाले आहेत. अटक आरोपी कुण्या पक्षाचे, कुणाची माणसे पकडले जात आहेत हे सर्वांना माहीत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथील अवैध धंद्याबाबतीत गृहविभागाचे यांचे दुर्लक्ष आहे. पाडव्या दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिर्थक्षेञ तुळजापूरला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणार असल्याने त्यांना महाविकास आघाडी भेटुन अवैध धंदे मुक्त तिर्थक्षेञ ठेवा व यावर तुमचे लक्ष असु द्या. असे भेटुन निवेदन देवुन विनंती करणार आहेत. त्यांनी जर आमची भेट नाकारली तर आम्ही पाडव्या दिनी निषेध करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. ड्रग्ज प्रकरणात दोषी कुणीही असु द्या आमच्यातला असला तरीही त्यावर कारवाई करा. असे यावेळी म्हणाले.
ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपने धिरज पाटील पराभवाचा वैफल्यातुन बडबड करीत असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना पाटील म्हणाले कि, माझा पराभव झाला. पण मला 96 हजार मते मिळाले ते पैशाने नाहीत तर स्वाभीमानाचे व निष्ठेचे मत असुन एवढे चांगले मते मिळाले असताना मी वैफल्यग्रस्त कसा? असा सवाल केला. यांचे हात बरबटले आहेत म्हणून ते विरोधकांना यात ओढत आहे. चौकशी निपष्पपणे करा राजकिय सुडबुध्दीने करु नये असे स्पष्ट करुन पोलिस तपास योग्य दिशेने चालु असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी अमोल कुतवळ, उत्तम अमृतराव, नागनाथ भांजी, श्रीकांत वाघे उपस्थितीत होते.