तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील वर्ग 1व2 राज्यसंवर्ग वर्ग-3 पदातील एकाच ठिकाणी 3 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्या बाबतीत रा. प. मध्यवर्ती कार्यालयाने माहिती मागवली आहे. यामुळे तीन वर्षापेक्षा अधिक काळ राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता बदल्यांची टांगती तलवार आल्याचे  बोलले जात आहे.  

या बाबतीत काढण्यात आलेल्या परिपञकात म्हटले आहे कि, वर्ग 1 व 2 तसेच  राज्यसंवर्ग वर्ग- 3 पदातील कर्मचा-यांच्या बदलीबाबतचे सूचना व बदली करण्याबाबतचे अधिकार संबंधित कार्यालय / घटक प्रमुख यांना असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना प्रसारीत करण्यात येत आहेत. संदर्भिय परिपत्रकानुसार राज्यसंवर्ग वर्ग-3 पदातील एखादया पदावर असणारा कर्मचारी सामान्यपणे 3 वर्षाचा कालावधी असेल व त्यानंतर त्यांची सर्वसामान्यपणे बदली मार्च / एप्रिल महिन्यात करण्यात येईल. बदली करण्यासाठी पात्र ठरलेल्या कर्मचा-यांकडून 3 ठिकाणासाठी पसंतीक्रम मागवून कार्यवाही करावी. अशा सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आपल्या विभागात वाहतूक निरीक्षक,  प्रभारक,  मुख्य आरेखक, आरेखक (यांत्रिकी), वरिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ लघुलेखक, लेखाकार कनिष्ठ संग्रह पडताळक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, सहा. सुरक्षा निरीक्षक, राखण व पहारा निरीक्षक, आगरक्षक, सहा.आगरक्षक या पदातील कर्मचा-यांना एकाच ठिकाणी 3 वर्षे इतका कालावधी पूर्ण झाला असल्यास उपरोक्त परिपत्रकातील तरतूदीनुसार त्यांच्या प्रशासकीय / विनंती बदलीबाबत आपणामार्फत कार्यवाही करण्यात यावी. आपण बदलीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती रा. प. मध्यवर्ती कार्यालयास  कार्यालयास पाठविण्यात यावी.


 
Top