उमरगा (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मात्र वृत्तपत्र विक्रीच्या कमिशनमध्ये वाढ होत नाही. यामुळे वृत्तपत्र विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे वृत्तपत्र कंपन्यांनी कमिशनमध्ये वाढ करावी. अन्यथा गुढीपाडवा रविवार दि. 30 मार्च रोजी उमरग्यातील वृत्तपत्र विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उमरगा शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक अध्यक्ष प्रदीप नागदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रदेश सदस्य गोरख भिलारे, जिल्हा उपाध्यक्ष रोहित थोरवे सदस्य गणेश भातुसे, सुरज बागल, रमेश बसगुडे, युवराज वंटे, विकास मदने,लहू पडवळ, अकबर शेख, मोहन वाघमोडे, सुरेंद्र सक्करगी हुसेन नुरसे ,रामलीग गाडवे अकबर शेख मोमीन ,यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
यावेळी गोरख भिलारे म्हणाले, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन वृत्तपत्र विक्री करतात. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मात्र वृत्तपत्र विक्रीच्या कमिशनमध्ये वाढ झाली नाही. यामुळे वृत्तपत्र विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. म्हणून वृत्तपत्र कंपनींनी कमिशनमध्ये वाढ कराावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कमिशनमध्ये वाढ जाहीर करावी अन्यथा रविवार दि. 30 मार्च रोजी गुढीपाडवा दिवशी उमरगा शहरातील वृत्तपत्र विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नंदकुमार देशपांडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र कंपन्याशी वृत्तपत्र विक्रेता संघटना कमिशनमध्ये वाढ करावी म्हणून मागणी करत आहे. मात्र याची दखल घेतली जात नाही. यामुळे संघटनेने वृत्तपत्र विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी वृत्तपत्र कंपन्यांनी वृत्तपत्र विक्रेते यांचा विचार करून कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.