धाराशिव(प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी चे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात आणि उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक, सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते यांच्या  हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून, शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते फित कापून कायक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी शाळेच्या सर्वच शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. अळणीचीं शाळा गुणवत्तेत अग्रेसर असल्याचे नमूद करून सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. सर्व बालकलाकारांचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा परिषद धाराशिव जि. प.  चे शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, भारत  देवगुडे, प्रकाश पारवे, बालाजी येरमुनवाढ, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, केंद्रप्रमुख  विवेक सरवदे, शेषेराव राठोड आणि गावचे सरपंच प्रमोद काका वीर,उपसरपंच कृष्णा गाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.संजीवनी बाबासाहेब पौळ, उपाध्यक्ष सौ. अफसाना सलीम शेख, तसेच सर्व सदस्य,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर लावंड, संतोष बप्पा चौगुले, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय कुमार नांदे, शिवाजी डांगे, शिवदास चौगुले, रजनीकांत तुपारे, प्रदीप म्हेत्रे, दिवाने,  शिवनेरी मित्र मंडळ होळी चौक आळणी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी छावा ग्रुप आळणी चे सर्व पदाधिकारी व सदस्य,विजय कुमार नांदे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध वर्तमानपत्राचे वार्ताहर उपस्थित होते.

 कार्यक्रमांमध्ये विविध अंगाने नटलेले सुंदर अशी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.करिष्मा मुलांनी हिच्या लावणीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तिच्या लावणीवर वर बक्षीसाची उधळण झाली, सर्वच गाणी अतिशय बहारदार व उच्च दर्जाची होती. ज्यामध्ये नृत्य, नाट्य, गायन, वेशभूषा स्पर्धा आणि पारंपरिक लोककला यांचा समावेश होता.

शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविकास शाळेचा लेखाजोखा मांडला. शाळेतील सर्व विविध उपक्रमाची माहिती दिली व शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकला. कार्यक्रम साठी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर यांची मोठी उपस्थिती लाभली.शाळेचे प्रांगण खचाखच भरले होते सलग पाच तास  चाललेल्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली व बक्षीसाची उधळण केली. सदर कार्यक्रमासाठी एक लाख रुपयाच्या आसपास बक्षीसाची रक्कम जमा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्रीमती म्हेत्रे, मते व कराड यांनी केले, शेवटी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेतर्फे व व्यवस्थापन समितीतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

 
Top