धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह ा परिषद शाळेतील शिक्षक भरती स्पर्धा परीक्षेतूनच होत असल्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा. असे आवाहन धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या गुढी पाडवा प्रवेश वाढावा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी केले.

प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वतीने राबवण्यात येत असलेल्या “गुढी पाडवा प्रवेश वाढवा“ अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद शाळा आरणी, ता. धाराशिव येथे  बोलत होते. या प्रसंगी  प्राथमिक शिक्षणाधिकारी मा अशोक पाटील, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ दयानंद जाटणूरे,प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे,विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, राजेंद्र मगर, राजाभाऊ पडवळ सरपंच अजित घोरपडे,माजी सरपंच गोविंद हारकर, विजयकुमार घुटे, शिक्षक संघाचे राहुल भंडारे, मोहनराव जगदाळे, प्रशांत घुटे, महादेव मेनकुदळे, तानाजी खंडागळे विक्रम लोमटे इत्यादी उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ घोष म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा दर्जेदार व शाळेतील शिक्षक मेहनती व परिश्रम करणारे आहेत यांना सर्व पालक, व पदाधिकारी यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.  यावेळी शिक्षणधिकारी अशोक पाटील, डॉ दयानंद जाटणूरे, बाळकृष्ण तांबारे यांचे भाषण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत घुटे, शाळेतील शिक्षक फुलचंद साबळे,प्रसाद मुंढे, राजेंद्र मगर, गोविंद माळी, खयूम फकीर, परसराम भांडवले सुलभा बर्वे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक रावसाहेब घुटे तर सूत्रसंचालन मनीषा जाधव यांनी केले. तर आभार फुलचंद साबळे यांनी मानले. 

 
Top