वाशी(प्रतिनिधी):- येथील अजिंक्य प्राथमिक व माध्यमिक शाळेचे दोनदिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.कार्यक्रमामध्ये दोन दिवस प्रमुख उपस्थितांमध्ये केंद्रप्रमुख कैलास चौधरी नागनाथ(बापू )नाईकवाडी(नगरसेवक न. पं. वाशी)दादासाहेब चेडे (सामाजिक कार्यकर्ते) श्यामलताई कवडे, वर्षा कवडे, वंदनाताई कवडे (नगरसेविका न. पं. वाशी), कैलास चौधरी, तुकाराम वीर, विजय कागदे, काकासाहेब मोरे, बाळासाहेब औताडे,अतुल चौधरी, सदाशिव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पहिल्या दिवशी अजिंक्य प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माने मनिषा यांनी तर दुसऱ्या दिवशी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका सौताडेकर,पल्लवी क्षीरसागर,प्रीती गडगडे,स्वाती शिंदे, सारिका जगताप यांनी केले.
स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीते, शिववंदना, भक्तीगीते भावगीते, नाट्यछटा यांची रेलचेल होती. यामध्ये आकर्षण ठरले ते महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण दृश्य,गौरव महाराष्ट्र संस्कृतीचा कथ्थक नृत्य इत्यादी नृत्यांनी प्रेक्षकांनामंत्रमुग्ध केले. मोठ्या पडद्यावरचा स्नेहसंमेलनाचा पहिलाच प्रयोग भन्नाट,कुतूहल निर्माण करणारा आणि चर्चेचा विषय ठरला. सदर कार्यक्रमात संस्थेने आदर्श शिक्षक -शिक्षिका पुरस्कार २०२४-२५ प्रदान करण्यात आले.यामध्ये शिक्षकांची शाळेवर असणारी निष्ठा आणि विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी दशकभर कार्य करणाऱ्या संध्या शरद कोल्हे,नाईकवाडे मनीषा मछिंद्र,स्वप्नाली सयाजी सांडसे,शिंदे रामहारी मसा, यांचा सन्मानचिन्ह, रोख रक्कम ५००१,तसेच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव केंद्रप्रमुख, संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संस्था सचिव श्रीधर पवार यांनी यावर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच पुढील शैक्षणिक वर्षी २०२५-२०२६ मध्ये सीबीएसई पॅटर्न, गुरुकुल शिक्षण पद्धतीचे वसतिगृह, फाउंडेशन कोर्स सुरु करण्याचा संकल्प करण्याचा मनोदय व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे आभार जयश्री लावंड आणि तानाजी चोथवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.