तुळजापूर (प्रतिनिधी)- लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे प्रस्तावित तलावामुळे शेतकऱ्यांची शेती आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या तलावाला विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने हा तलाव तात्काळ रद्द करावा, अन्यथा आम्हाला आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरास शेतकरी हे अल्पभूधारक आहेत जर हे तलाव झालं तर सगळेच अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या तलावामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येईल. याबाबत प्रशासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


 
Top