परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील खासापूरी येथे नवीन 33 के. व्ही. विद्युत केंद्रास मंजूरी देऊन उभारणीचे काम तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता.
खासापूरी मध्यम प्रकल्पात पाणी असूनही दरवर्षी शेतकऱ्यांना वीजेच्या समस्येचा सामना करावा लागतो. खासापूरी व परिसरातील गावचे बागायती क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तेथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपास पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही. अत्यंत कमी दाबाने होणारा वीज पुरवठा व सततच्या खंडीत होणारा वीज पुरवठाा यामुळे सातत्याने विद्युत रोहीत्र (ट्रान्सफार्मर) व शेतीपंत जळण्याचेही प्रमाण मोठे आहे. अत्यंत कमी दाबाने व सतत खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे खासापूरी व परिसरातील शेतकरी त्रस्त असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात. नुकसान होते.
खासापूरी येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असता त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.