धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा.लि. कारखान्याचे दुसऱ्या गळीत हंगामातील दि.1 ते 15 जानेवारी या पाचव्या पंधरवडा कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे बिल त्यांच्या खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती दि.16 जानेवारी  रोजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बालाजी उर्फ नानासाहेब पाटील यांनी दिली.

एन.व्ही.पी. शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बील जमा करणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना आहे. तसेच यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवडा संपल्यावर जमा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव या बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


 
Top