धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने प्रथम गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या तिसऱ्या पंधरवाड्याचे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन आपले ऊसबिल घ्यावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

एनव्हीपी शुगरचा चाचणी गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सन 2024-25 मध्ये प्रथम गळीत हंगामातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाचणी गळीत हंगामात दिलेल्या शब्दाप्रमाणे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत ऊसबिल देण्याचे दिलेले वचन प्रथम गळीत हंगामातही पूर्ण केले जात आहे. तिसऱ्या पंधरवाड्यात 01 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. कारखान्याच्या वतीने दि.15 डिसेंबर 2024 पर्यंत 40,468 मे.टन ऊसाचे बिल पंधरवाडा संपल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात बिल जमा करणारा धाराशिव जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. तसेच यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर तात्काळ जमा करण्यात येणार आहे.  ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते क्रमांक दिलेला नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, असे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी कळविले आहे.

 
Top