तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभेचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात तालुक्यातील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या जनता दरबारात विविध कार्यालयातील प्रलंबित 240 अर्ज दाखल झाले यावर तात्काळ संबंधित विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात निकाली काढा अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी सुचना वजा इशारा दिला.
या जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी या शेतकऱ्यांच्या होत्या. त्यात महावितरण, शेत, शिव रस्ते, परस्पर शेत नावाने करणे सह अनेक समस्या जनतेने जनता दरबारात मांडल्या. या जनता दरबारात दहा ते बारा महिलांनी तक्रारी खासदार समोर मांडल्या. यात महावितरण, तहसील, आरटीओ, पोलिस, आरोग्य, भूमी अभिलेख, नगरपरीषद, कर्ज बँका सह अनेक विभागाच्या तक्रारी होत्या.
यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पोलिस निरक्षक रविद्र खांडेकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शामलताई पवार (वडणे), तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उप तालुकाप्रमुख सुनील जाधव, शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम, अर्जुनआप्पा साळुंखे, सागर इंगळे, प्रतिक रोचकरी, विकास भोसले, डॉ. जितेंद्र कानडे बाळकृष्ण पाटील, श्याम माळी, शिवाजी कदम, कृष्णा मोरे, धुळाप्पा रेक्षा ,अमोल जाधव, अनमोल साळुंखे ,नवनाथ जगताप, राहुल खपले, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, बसवराज बिराजदार ,तुळशीराम बोबडे, दगडू नाना शिंदे, सिध्दराम कारभारी, चेतन बंडगर, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.