धाराशिव (प्रतिनिधी)- विरोधकांना उत्तर देणारा तसेच सर्व समावेशक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. तसेच अर्थसंकल्पातील कृषी, आरोग्य या सर्व योजनांची माहिती यामध्ये मांडलेली आहे. तसेच महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाड्यासाठी 600 कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्पासाठी मंजूर केलेले आहेत. त्याचप्रमाणे मेट्रोसाठी देखील विविध क्षेत्रातील अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या दिसून येत आहेत.
खऱ्या अर्थाने विरोधकांना उत्तर देणारा हा अर्थसंकल्प असलेला देखील आपल्याला दिसून येत आहे. विरोधक म्हणत होते राज्यातील लाडकी बहिणीसाठी योजना करता तेव्हा लाडके भावांसाठी सुद्धा करा त्यासाठी राज्याने सुद्धा लाडक्या भावांसाठी योजना आणली .तसेच केंद्र सरकारने सुद्धा लाडक्या भावांसाठी तर महिना पाच हजार रुपये ईस्टर्नशिप म्हणून दर महिन्याला देण्यात येणार असून देशातील एक कोटी तरुणांना ईस्टर्नशिप देण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीसाठी दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. आवास योजना अंतर्गत तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत. त्यात शहरी व ग्रामीण भागाचा देखील समावेश असणार आहे.
त्याचप्रमाणे कृषी, आरोग्य, शैक्षणिक व इतर सर्व बाबींसाठी न्याय देणारा अर्थसंकल्प म्हणून हे आपण याचा विचार करू शकतो. विरोधक फक्त चर्चा करतात मात्र विकासाच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत. लोकसभेत नुसती चर्चा न करता विरोधकांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्याची गरज होती मात्र त्यांनी तो दिला नाही हे आपल्या देशाच्या दुर्दैव आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने जो केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. ग्रामीण रस्ते व्यवस्थित व्हावी त्यासाठी रस्ते सुधारण्यासाठी 400 कोटी निधी दिलेला आहे तो सुद्धा अतुलनीय आहे. केंद्र सरकारचा अर्थविषयक धोरण सर्वांसाठी हितदायक ठरणार आहे व हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे असे नितीन काळे म्हणाले.