भूम (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या भावना दुखावुन तसेच जाती धर्मा वर मते मागुन आदर्श आचार संहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद व्हावा अशी मागणीची निवेदन सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय  भूम यांना निवेदन देण्यात आले.

लोकसभा निवडणुक रणधुमाळी मध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदार संघाचे घड्याळ चिन्ह घेऊन उभा असलेले अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना ताई पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. तसेच त्या वक्तव्यामुळे जाती धर्माच्या नावावर मते मागता येत नाही याची पूर्ण कल्पना असताना देखील जाणून बुजुन धर्माच्या नावाने मते मागण्याचे काम प्रा.रवींद्र गायकवाड यांनी घड्याळ चिन्ह करीता केलेले आहे. माजी खासदार यांनी मुस्लिम समाजाच्या भावना भडकावल्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहे जे की आदर्श आचारसंहिता याचे उल्लंघन केले आहे. तरी त्यांच्यावर कडक शासन करुन कायदेशीर कार्यवाही करावी ही समस्त मुस्लीम समाजाची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना सकल मुस्लिम समाज भूम उपस्थित होता.


 
Top