तुळजापूर (प्रतिनिधी) - नगरपरिषद मधील  एकञित मानधनावरी अभियंता अविनाश अशोक काटकर, यांनी बांधकाम विभागात अक्षम्य चुका केल्याने अखेर 1/4/2024 पासुन त्यांची सेवा संपुष्टात करण्यात येत असल्याचे आदेश मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी दिल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणुन गेले आहे.

नगरपरिषद तुळजापूर अंतर्गत आपली सेवा समाप्त केलेबाबत. पञात म्हटले आहे की  आपली तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. व त्यास संदर्भ क्र. 2 अन्वये दि. 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु संदर्भ क्र. 3 विभाग प्रमुख यांच्या अहवालानुसार सद्यस्थितीत बांधकाम विभागाकरिता आपल्या सेवेची आवश्यकता वाटत नाही. तसेच आपण तुळजापूर नगरपरिषद बांधकाम विभाग येथे काम करित असताना अक्षम्य स्वरूपाच्या अनेक चुका वारंवार करत असल्याचे विभाग प्रमुख यांच्या अहवालानुसार माझ्या निदर्शनास आले आहे. वेळोवेळी आपणास चुका दुरुस्त करणेबाबत तोंडी सूचना देऊन देखील पण आपल्या वर्तनात कोणत्याही स्वरुपाची सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.

तरी आपल्या उक्त वर्तनामुळे आपली निव्वळ कंत्राटी स्वरूपाची सेवा दि. 01/04/2024 पासुन संपुष्टात आणण्यात येत आहेत. तसेच आपली नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असल्याने आपणास सेवाविषयक कोणतेही लाभ मागता येणार नाहीत. तसेच आपणाकडे असलेले सर्व शासकीय कागदपत्रे, संचिका, मोजमाप पुस्तिका व इतर सर्व महत्वाची कागदपत्रे संबंधीत विभाग प्रमुख यांच्याकडे आवश्यकत्या यादीसह रितसर विनाविलंब हस्तांतरित करण्यात यावेत. त्यानंतर कोणतेहे शासकीय कागदपत्रे / दस्ताऐवज आपणाकडे दिसून आल्यास आपणाविरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पञ अविनाश काटकर यांना दिले आहे.


 
Top