धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीला उभे आहेत. खासदार जरी उमेदवार असले तरी आपणच उमेदवार आहोत, या भावनेने कामाला लागण्याचे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. शनिवारी दि 23 मार्च रोजी धाराशिव तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.                                                            

यावेळी बैठकीला जिल्हा सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, संग्राम देशमुख, तुळशीदास जमाले तसेच तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, गटप्रमुख आदीची उपस्थिती होती.              

आमदार पाटील म्हणाले की, आपले उमेदवार उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवार शोधताना दमछाक झाल्याचे दिसत आहे. आपला उमेदवार इतका सक्षम आहे की, समोर दुहेरी सत्ता, अफाट पैसा, अमर्याद यंत्रणा असतानाही त्यांना तुल्यबळ व्यक्ती मिळत नाही. हीच आपल्या विजयाची खात्री आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संवाद साधल्याने कार्यकर्त्याला मोठी उर्जा मिळाली असल्याचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी सांगितले.


 
Top