कळंब (प्रतिनिधी)-मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी स्वराज्यावर केलेल्या आक्रमणामुळे होणारी रयतेची छळवणूक थांबविण्यासाठी व रयत सुखी राहावी यासाठी  शिवाजी महाराज यांनी पुरंदरचा तह केला. या तहात  23 किल्ले, चार लाख होन उत्पन्नाचा मुलुख व पुत्र शंभुराजे यांच्यासाठी मनसबदारी मान्य करून मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे पाठविले. हा प्रसंग सर्वात नामुष्की सर्वस्व गम विनारा होता. परंतु हे सर्व संकटाचा महाराजांनी मोठ्या युक्तीने सामना केला असे विचार प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी शिवसेवा तालीम संघ शिवजन्मोत्सव समिती कळंब आयोजित शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या विषयावर व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफले. आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात मिळालेली वागणूक याप्रसंगी दाखवलेला स्वाभिमान यानंतर आग्रा येथून परत स्वराज्यात दाखल होईपर्यंत प्रसंग इतिहासातील नोंदी व दाखले देत आपल्या पहाडी आवाजात मांडले.

याविषयी पुढे बोलताना शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी होती. आग्र्याहून सुटका हे या यंत्रणेचे यश आहे. यासाठी बहिर्जी नाईक यांनी केलेली कामगिरी याला तोड नाही असे सांगितले. यावेळी डॉ.माणिकराव डिकले, डॉ. रमेश जाधवर, डॉ. सुरेश वाघ डॉ.अमित पाटील, डॉ. सुशील डेंगळे, डॉ. दीपक कुंकूलोळ, डॉ. राजेंद्र बावळे डॉ. सुनील थळकरी, डॉ. सचिन पवार, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. प्रशांत काकडे,डॉ. शेळके, डॉ. सुशील अडसूळ याचबरोबर नागनाथ घुले, सुनील लाटे निलेश होनराव, विकास गडकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष  शिवाजी कदम यांनी सत्कार केला तर आ. कैलास पाटील यांचा सत्कार शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी केला. धाराशिव येथून उपस्थित पंकज पाटील व सोमनाथ गुरव यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट व रमेश शिंदे यांनी केले. 


 
Top