धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करणे, दुध दर, लाईट मिळणे, पिक विमा रक्कम मिळणे, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करणे या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.1) जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील जयंतराव पाटील, रोहीत पवार व इतर अनेक सहकारी आपल्याबरोबर सत्तेत सहभागी होत नाहीत त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या मार्फत दबाव आणण्यासाठी नोटीस बजावून कारवाई करत आहेत. तसेच खरीप 2022 मधील शेतकऱ्याचे सोयाबीन हे नगदी पीक कमी पावसामुळे हातचे निघून गेले.जिल्ह्यात शेतीला पाणी नाही वीज उपलब्ध होत नाही, लातूर, ढोकी, तडवळा, बार्शी, टेभुर्णी रस्ता रुंदीकरण करणे, पूशधनाला चारा व पाणी नाही, मजूरांना काम नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व मजूर चिंता व भयग्रस्त झालेला आहे. यासाठी राज्यशासन केंद्रशासन व जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीविषयी वेळोवेळी लेखी निवेदन देवून ही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्या निषेधार्थ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, शिवाजी सावंत, विठ्ठलराव माने, रमेश देशमुख, बालाजी डोंगे, अनिल जाधव, शामसुंदर पाटील, लक्ष्मणराव जाधव, महादेव पंडागळे, आदीत्य पाटील, भारत शिंदे, ॲड प्रविण शिंदे, मनोहर हरकल, औदूंबर धोंगडे, नानासाहेब जमदाडे, दत्तात्रय वाघमारे, राजेंद्र कदम, मुबारक जाफर गवंडी, सलमान पठाण, वलीभाई शेख, अनवर पठाण, मुस्तफा शेख, नरदेव काका कदम, किशोर आव्हाड, प्रदिप काळदाते, आप्पासाहेब आव्हाड, शाहुमामा भोसले, आवताडे मामा, भागवत पाटील, सुधाकर खापे, हणमंत गायकवाड, विकास सिरसट यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.