भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील मोजे उळूप या ठिकाणी गट नंबर 442 मध्ये गेल्या कित्येक पिढ्यापासून स्मशानभूमी अस्तित्वात होती. पण आत्ता आलेल्या नवीन ग्रामपंचायत ने एक ठराव घेऊन गट नंबर 667 मध्ये नवीन स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केली आहे. ही जागा बौद्ध व मातंग समाजाच्या घरापासून अंदाजे 50 ते 60 फूट अंतरावर आहे. या ठिकाणी स्मशानभूमी झाल्यास त्या ठिकाणी होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे धूर व उग्र वास येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात येणार आहे. या कुटुंबात लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती सध्या राहत आहेत. याबाबतीत या कुटुंबांनी तेथील ग्रामपंचायत व सरपंच यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असे आश्वासन दिले होते की, या ठिकाणी स्मशानभूमी केली जाणार नाही. पण त्यांनी 667 मधील एका शेतकऱ्याची जागा घेऊन याच ठिकाणी नवीन स्मशानभूमी बनवण्याच्या हालचाली सुरू केले आहेत. या ठिकाणी स्मशानभूमी झाल्यास आम्हा कुटुंबाला तेथून स्थलांतर करावे लागेल. व याबाबतीत तक्रारी केल्यास आम्हाला दाब दडप करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे स्मशानभूमीचे काम त्वरित थांबून ज्या ठिकाणी अगोदर स्मशानभूमी आहे त्याच ठिकाणी स्मशानभूमी व्हावी. अन्यथा हे सर्व कुटुंब उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे असे बौद्ध व मातंग कुटुंबांनी उपविभागीय अधिकारी भूम तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे केली आहे.