उमरगा (प्रतिनिधी)-समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक लोकशाही या वारकरी संप्रदायातील मूल्याच्या उत्कर्ष व संवर्धनासाठी संत चोखामेळा अध्ययन केंद्राच्या वतीने “चोखोबा ते तुकोबा“ या समता वारीचे उमरगा शहरात मंगळवारी आगमन होताच शहरातील बांधवानी मंगळवारी यांचे मोठ्या त्साहात स्वागत केले.

यावेळी समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील, कवी फुलचंद नागटिळक, प्रा. नरसिंग वाझरकर, कवी शरद गायकवाड यांचं शाल पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. ही वारी संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून सूरु झाली असून संत तुकोबांच्या जन्मभूमी असलेल्या देहूगावं येथे याचा समारोप होणार आहे. मानवता आणि बंधुभाव या मूल्याचा जागर व्हावा हा या समता वारी आयोजना मागील मुख्य उद्देश असल्याचे सचिन पाटील यांनी सागितले.

ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, माकणी, उमरगा, नाईचाकूर, औसा, लातूर, तेर, धाराशिव, कसबे तडवळे, येरमाळा, वाशी, भूम, पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, बोधेगाव, पैठण, संभाजीनगर जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर,कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली,पुणे, आळंदी यामार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. या वेळी  अविनाश काळे, नारायण गोस्वामी, प्राफ युसुफ मुल्ला,  माधव सूर्यवंशी, गो.ल.कांबळे, संजय सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती.


 
Top