भूम (प्रतिनिधी)- भगवान परशुराम आर्थीक विकास मंडळ स्थापन करुन त्यास स्वायत्ता दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी जालना येथे दिपक रणनवरे यांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणास भूम येथील सकल ब्राम्हण संघटना यांनी पाठींबा देत श्री परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापना करण्यात यावे. याबाबत दि. 4 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व तहसिलदार सचिन खाडे यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राम्हण समाजास दैनंदिन जिवणात येणाऱ्या अडचणी आवश्यक असणारी साधने जागतिक व्यवहाराबाबत उपलब्ध संधी, प्रगतीचे मार्ग यासाठी नवनविन संधी यासाठी काळाची गरज म्हणून विचाराच्या देवाणघेवाणीतून समाजाची प्रगतीसाठी, आर्थीक पाठबळ मिळण्यासाठी व समाजाच्या विकासाठी श्री परशुराम आर्थीक विकास महामंडळाची स्थापना करावी ही प्रमुख मागणी आहे. यासाठी जालना येथील ब्राम्हण समाजाचे दिपक रणनवरे यांनी 28 नोंहेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास भूम शहर व तालुक्यातील सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने पाठींबा देत श्री परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे ही मागणी या निवेदणातून करण्यात आली. यावेळी हभप अरुण शाळु महाराज,भूम तालुका ब्राम्हण संघटना तालुका अध्यक्ष सुधिर देशमुख, शहर अध्यक्ष अँड. संजय शाळु, हेमंत देशमुख, ए. पी. देशपांडे, रुपेश देशमुख, श्रीपाद देशमुख, अनिल बुरटे, प्रशांत देवडीकर, सुमंत देशमुख, भगवंत देशमुख, रत्नाकर अरगडे, अमोल तुळशी, मयुर शाळु, सचिन बारगजे, मुसांडे, हर्षल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.


 
Top