धाराशिव (प्रतिनिधी)-लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षिरसागर यांचे नेतृत्वाखाली दि. 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मातंग समाजाला एस.सी प्रवर्गात अ ब क ड करून स्वतंत्र आरक्षण मिळावे, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करण्यात यावी, साठे नगर तुळजापूर नाका धाराशिव येथील मातंग समाजाची घर जागा नावे करून घरकुल देण्यात यावीत यासह मातंग समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये मुकेश देडे, राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, महासचिव बालाजी गायकवाड,हेमंत खंदारे,सारिका कांबळे,दिलीप गायकवाड, रोहित खलसे, अश्विनी साठे, दत्ताभाऊ साठे, सुरज लोंढे, रोहित गायकवाड, अमोल सगट,संतोष मोरे, सुदर्शन रोडगे, अमोल क्षीरसागर,मारुती क्षीरसागर यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.