तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन त्या जागी जे नविन बसस्थानक उभा करण्यात येत असुन सदरील काम अंदाजपञक नुसार व नियोजीत आराखड्या प्रमाणात करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) गटाने दिला आहे.
विभागीय नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सदर काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले डस्ट मध्ये बांधकाम चालु असल्याबाबत तसेच नविन बस स्थानकाचा नियोजीत नकाशा, आराखडा नलावता व इस्टीमेंट प्रमाणे काम होत नाही. तसेच जे जुने स्टँड मध्ये स्क्रॅब मटेरीयल (स्टील) याचा वापर सदर बांधकामात केलेल जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर बांधकाम हे पत्र्याचे कंपाऊंड मारुन त्याच्या आत अतिशय निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले जात आहे. तसेच नविन बस स्थानकाचा नियोजीत नकाशा, आराखडा सदर ठिकाणी न लावता व इस्टीमेंट प्रमाणे मटेरीयल वापरुन काम होत नाही. सदर बस स्थानकाचा आराखडा हा पुढील 50 वर्षाचा विचार करुन करण्यात आलेला आहे. परंतु होत असलेले बांधकाम पहाता सदर काम हे केवळ 5 ते 10 वर्षापर्यंतच टिकणार आहे. तसेच खडी पासुन बनविलेल्या डस्ट मध्ये काम चालु असुन कामावर पाणी वापरल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्याही वेळी सदर बांधकाम ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बांधकाम ढासळल्यास मोठी जिवीत हाणी होऊ शकते.
तरी आपण याबाबत तात्काळ चौकशी करुन चालु असलेले बांधकाम तात्काळ थांबवुन इस्टीमेंट प्रमाणे व नियोजीत आराखड्या प्रमाणे सदर चालु करण्यात यावे अन्यथा नाविलाजास्तव लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व्यक्तीशा जबाबदार राहाल असे निवेदनात म्हटले आहे.