धाराशिव (प्रतिनिधी)-भारतासारख्या विविधतेने समृद्ध असलेल्या, खंडप्राय देशाला भौगोलिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्या एकसंघ ठेवून देशात शांतता, सुव्यवस्थता, सुरक्षितता, लोककल्याण, एकात्मता, देशाचे अखंडत्व अबाधित ठेवून प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी शोषणमुक्त समाज निर्माणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित मानवी जीवन मुल्यांची जोपासना करणारा महान राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भारतीय संविधानाला ओळखले जाते, असे मत
प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित गुरुदेव कार्यकर्त्ये व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. भारतीय राज्यघटना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव उगीले यांनी केले तर आभार डॉ. दत्ता साखरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नॅक समन्वयक डॉ. फुलसागर, सह. समन्वयक डॉ. संदीप देशमुख, स्टाफ सेक्रेटरी डॉ. साखरे, प्रा. समीर शेख, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.