तुळजापूर -(प्रतिनिधी) येथील कै.लक्ष्मीबाई बाबुराव साळुंके यांचे वयाच्या 97 वर्षी दिनांक 26 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी,सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्यावर सायंकाळी मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

चार दिवसांपूर्वी गल्लीत सायंकाळच्या वेळेस त्या गटारीत पडल्या व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. विशेष म्हणजे त्या गटारीवर झाकण नव्हते.  खाजगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांचे निधन झाले.मंक्कावती गल्लीत अनेक ठिकाणी गटारीवर झाकण नाही.यामुळे असे अपघात होत आहेत.


 
Top