परंडा (प्रतिनिधी)- मणिपूर मधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडी परंडा तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये मौन सत्याग्रह करून निषेध करण्यात आला. मणिपूर राज्यात मागील तिन महिन्यापासून हिंसाचार ,दंगल ,जाळपोळ ,महिला अत्याचार ,सैनिकावर हल्ले सुरू आहेत.या मानवतेला काळिमा फासणार्या आणि देशविघातक घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परंडा शहरात मौन काळ्या फित्या लावून सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथील तहसिलदार घनशाम अडसुळ यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येऊन मनिपुर मध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सदर एक दिवशीय सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते.या सत्याग्रहामध्ये परंडा तालुक्यातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा प्रवक्ते प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे ,शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटिल ,सामाजीक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , फुले आंबेडकर विव्दत सभेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. प्रकाश सरवदे आणि डॉ.अनंत देडगे ,एम आय एम तालुकाध्यक्ष जमीलभाई पठाण ,आणासाहेब बनसोडे ,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष तानाजी जाधव ,शहराध्यक्ष किरण बनसोडे राहुल पवार ,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे ,बाळासाहेब गोसावी ,रणधिर मिसाळ ,भारतीय बौद्ध महासभा ता.अध्यक्ष महाविर बनसोडे ,समिर पठान ,जब्बार जिनेरी ,प्रदीप परिहार ,गणेश सरवदे ,रणवीर निकाळजे ,धनंजय चौधरी ,चंद्रहास बनसोडे ,संदिपान कांबळे ,भैरवनाथ यादव ,पांडुरंग समिंदर ,अमर गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.