धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 25 दिवस पावसाने दडी मारलेली असून खरिपातील सोयाबीन, उडीद, मुग, मका आदि पिके धोक्यात आलेली असून पुर्णता करपुन गेलेली आहेत म्हणून शासनाने पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करावी व तसेच कांदा पिकावरील 40% निर्यात शुल्क रद्द करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी व्दारा निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष .धिरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष अशोक शेळके, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, शिलाताई उंबरे, ओबीसी अध्यक्ष धनंजय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजे निंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, अल्पसंख्याक अध्यक्ष आयुब पठाण, प्रभाकर लोंढे, संजय गजधने, जिल्हा सचिव सर्फराज काझी, सलमान शेख, प्रेमानंद सपकाळ, अभिषेक बागल, संजय देशमुख, शेख मुहीब, अशोक बनसोडे, अंकुश पेठे, बालाजी माने, मोमिन नियामत, आसिफ मुलानी, प्रेमानंद सपकाळ, राहुल गोट, आनंददराव घोगरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.