तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील जळीतग्रस्त नंदगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळेस गावातील 13 युवकांनी निजामाविरूध्द सशस्त्र उठाव करून सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे निजामाच्या रजाकार सैन्यांनी नंदगाव जाळून बेचिराख केले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदगावला विशेष आर्थिक मदत करून विकास करावा अशी मागणी माजीमंत्री तथा काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मराठवडामुक्ती संग्राम दिनानिमित्त संपूर्ण मराठवाडयामध्ये 17 सप्टेंबर 2023 रोजी अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 1948 च्या मराठवाडामुक्ती संग्रामामध्ये नंदगाव मधील तरुणांनी सशस्त्र उठाव करुन निजामाविरुध्द तीव्र आंदोलन केले. त्यामध्ये 13 युवकांचे बलिदान झाले. रजाकारांनी संपूर्ण नंदगाव जाळून बेचिराख केले. त्यामध्ये गावांची संपूर्ण हानी झाली. स्वतंत्र्य लढयातील गावांचे योगदान ध्यानात घेऊन स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी, सुशोभिकरणसाठी आवश्यक तो निधी देणे अपेक्षित होते. परंतु जळीतग्रस्त नंदगावसाठी अमृत महोत्सवी वर्षामध्ये सुधारणेसाठी कसलीही आर्थिक तरतूद केली नसल्याचे समजते.

तरी जळीतग्रस्त नंदगावच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी माजी मंत्री चव्हाण यांनी केली आहे.


 
Top