ताज्या घडामोडी

 


तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री,तुळजाभवानी महाविद्यालयात  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय कविसम्मेलन संप्पन्न  झाले. कवि संम्मेलनाचे उदघाटन नगरसेवक  सुनिल रोचकरी यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवकरणजीत इंगळे यांची उपस्थीती होती.

यावेळी  प्राचार्य डॉ.एस,एम.मणेर यांनी सद्य राजकीय परिस्थीतीवर स्वरचीत कविता सादर करुन सर्वच राजकीय पक्ष व नेतेमंडळी,कार्यकर्ते यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आपल्या कवीतेतुन राज्यकर्त्यांच्या मतलबी राजकारणावर बोट ठेवले.कवी  प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी कविता हे जिवन जगण्याचे साधन असुन कवीता सर्व दुखे विसरायला मदत करत असल्याचे स्पष्ट करुन मराठवाड्याच्या वेदना,व्यथा,विवंचनेवर फुंकर घालणाऱ्या कवीता सादर करुन प्रेमाचा धागा पकडुन विनोदी कवितेचे सादरीकरण केले. 

प्रा.हणमंत पडवळ यांनी चेहरा या कवीतेतुन तरुणीच्या सौंदर्याचे वर्णन केले. तर कवियत्री शैलजा कारंडे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातुन नव्या बाबींचा स्वीकार करण्याचा आशावाद व्यक्त केला. कवियत्री शशिकला गुंजाळ यांनी आई वडीलांच्या कर्तबगारीची जाणीव आपल्या कवितेतुन निर्माण केली. याचबरोबर जेष्ठ कवी डॉ.मधुकर हुजरे यांची प्रेमलहर कविता,श्रीमती वंदना हुजरे यांची ॲडजेस्टमेंण्ट दी लाईफ, ॲड.शुभदा पोतदार यांची शब्द कविता,विजय देशमुख यांची आंबट चिंबट कविता,सौ.मंगला बोराडे यांची गुलमोहर कविता अशा एकाहुन एक सरस कवातेतुन विद्यार्थांना खळखळुन हसविण्याबरोबरीनेच अंरमुख करायाला लावले.सुत्रसंचलन प्रा.श्रीमती कदम एस.एम.यांनी केले तर आभार प्रा.अनिल नवत्रे यांनी मानले 

या प्रसंगी प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडुन पी.एच.डी.पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला. प्रा.डॉ.मंत्री आडे,  प्रा.श्रीमती एस.एम.कदम, प्रा.धनंजय लोंढे, मेजर डॉ.वाय. ए.डोके, प्रा. जे.बी.क्षिरसागर, प्रा. आशपाक आतार आदींनी परिश्रम घेतले.


 
Top