धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील कनगरा येथे आपल्या ग्राम विकास निधीतून (रु.10 लक्ष) गाव अंतर्गत बाजार चौक येथे सिमेंट रस्त्याचे तसेच गावातील मुख्य रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

नागरिकांशी संवाद साधून गावातील अडचणी जाणून घेतल्या. उर्वरित सर्व विकासकामे देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नितीन काळे यांनी सांगितले. याप्रसंगी संजय दळवे, महेबुब शेख,श्रीधर इंगळे,विठ्ठल सुरवसे, संतोष कांबळे,व्यंकट धाराव, सचिन इंगळे, विकास गायकवाड, कमलाकर दळवे, वामन दळवे, अण्णा इंगळे, धनंजय तिगाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top