धाराशिव (प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. याचा आनंद कॉंग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है.. अश्या घोषणा दिल्या. तसेच केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारचा निषेध ही करण्यात आला.
यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक बापू शेळके, सरचिटणीस A.जावेद काझी, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते शहाजी मुंडे सर, भारतयात्री सरफराज काझी, महिला प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, प्रदीप बप्पा घुटे, सलमान शेख, महेश पाटील, अशोक बनसोडे, A.राजू आडे, संजय गजधने, आरेफ मुलाणी, संतोष पेठे, अभिमन्यू रसाळ, विष्णू पेठे, हज्जू शेख इत्यादी सहभागी झाले होते.