कळंब (प्रतिनिधी):- स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने ५७५ फूट तिरंगा झेंडा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. होते.युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत होण्यासाठी गतवर्षी प्रमाणे या ही वर्षी तिरंगा पदयात्रा चे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा शुभारंभ प्रसंगी स्व.सै.गणपतरावजी कथले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला कथले चौक येथून
अहिल्यादेवी होळकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,मुंडे गल्ली व याची सांगता राष्ट्र गीत होऊन करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी ह.भ.प महादेव महाराज आडसूळ,संजय मुंदडा,अतुल गायकवाड,अनिल हजारे,सुनील गायकवाड,सतपाल बनसोडे,शरद जाधवर, शिवाजी शिरसाठ, प्रकाश भडंगे,माधवसिंग राजपूत,बंडु ताटे,विकास कदम,इम्रान मुल्ला,संतोष भांडे,मकरंद पाटील,बाबू चाऊस,दत्ता लांडगे, लाखन गायकवाड,शिवाजी गिड्डे कथले आघाडी चे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, सुशील बलदोटा, गोविंद खंडेलवाल, सुजित बलदोटा, भाऊसाहेब शिंदे,अशोक फले,संताजी वीर,यश सुराणा,नवनाथ पुरी, धर्मराज पुरी,मनोज फलले,संकेत भोरे,विश्वजित पुरी,मनोज शिंगणापुरे,राहुल किरवे व रेणुका फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी उपस्थित होते.