धाराशिव (प्रतिनिधी)-हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी पोसिल विभागाच्यावतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपनाची मोहिम राबविली जात आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हा पोलीस दल आणि कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट, तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने भातंब्री आणि रायखेल डोंगर माळावर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते 1500 वृक्ष लागवड करण्यात आले. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जैविक कृषी तज्ञ अभय मुतालीक देसाई, सहाय्यक जिल्हा अधिकारी प्रियंवदा, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी गणेश चादरे, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे, तुळजापूर पोलीस विभागातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, चास्कर, भराटे, पोलीस उपनिरीक्षक बांगर, चनशेट्टी व मंजुळे मॅडम मान्यवर उपस्थितीत होते.या कार्यक्रमात अभय मुतलिक, उपजिल्हाधिकारी प्रियवंदा यांचेही भाषण झाले.
वृक्षारोपणासाठी भातंब्री गावाचे ग्राम पंचायत, इंदिरा कन्या हायस्कुल, मंगरुळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातंब्री, राजे शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. स्वागत डॉ. दयानंद वाघमारे तर सुत्रसंचालन मनोहर दावणे यांनी केले.