धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज असल्याचे उद्गार पवनराजे कॉम्लेक्स येथे झालेल्या नुतन पदाधिकार्‍यांच्या सत्कार समारंभामध्ये काढले. 

मागील 9 वर्षाचा भाजपा सरकारचा आढावा घेत असताना महागाई, ईडी, भ्रष्टाचाराचे आरोप तसेच शेतकर्‍यांची होणारी अवहेलना, बेरोजगारी आदी विषयांच्या अनुषंगाने बोलत असताना महाराष्ट्रातील राजकीय चालु घडामोडीवर प्रकाश टाकत असताना अजय देवगन यांच्या गंगाजल या सिनेमातील डायलॉग म्हणत सब पवित्र कर देंगे अशा पध्दतीची वर्तणुक भाजपा करत आहे. असे मत खा. राजेनिंबाळकर यांनी मांडले. या सत्कार समारंभाप्रसंगी धाराशिव कळंब विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी येणारी निवडणुक ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी होणार असून कोणतीही विचारसरणी नसलेल्या, सत्तेसाठी हापापलेल्या उमेदवारांना त्यांची जागा मतदानाद्वारे दाखवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे नुतन सहसंपर्कप्रमुख मंकरद राजेनिंबाळकर, रणजित ज्ञानेश्वर पाटील, दिपक जवळगे, दिलीप पाटील, प्रदिप मेटे, चेतन बोराडे, अमोल बिराजदार, सोमनाथ गुरव, मोईन पठाण, बजरंग जाधव यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, उपसरपंच पवन मोरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top