धाराशिव / प्रतिनिधी-

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाचे काम शेतकर्‍यांनी बळाचा वापर करुन बंद पाडल्याचे बाधित शेतकऱ्यांची बदनामी करणारे वक्तव्य विधान परिषदेच्या सभागृहात केल्याप्रकरणी रविवारी (दि.26) नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथे शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करण्यात आले. जगाच्या पोशिंद्या शेतकर्‍याचा न्याय्य हक्काच्या मावेजासाठी लढा सुरू असताना नाहक बदनामी करणाऱ्या मंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

 या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, समन्वयक दिलीप जोशी, चंद्रकांत शिंदे, बाधित शेतकरी महाळू  हलकंबे, उमेश चव्हाण, गुलाब शिंदे, अब्दुलरहेमान महंमदसाब, विरूपाक्ष माशाळकर, श्रीमंत फडतरे, बाळासाहेब लोंढे-पाटील, दिलीप पाटील, काशीनाथ काळे, शिवराम लोहार, गणपती कलकोटे, शहानवाज शेख, इरण्णा कलशेट्टी, राजेंद्र पवार, दत्तू घोडके, गणपत सुरवसे, महादेव बिराजदार, सुभाष पाटील, शरद पोतदार, रेखा पोतदार, प्रतापसिंग ठाकूर, दशरथसिंग ठाकूर, बंडू मोरे, सैफन मुल्ला, मकबुल मुल्ला, बालाजी ठाकूर, खंडू हलकंबे, तानाजी बनछेडे, पंडित पाटील, लक्ष्मण निकम, प्रशांत शिवगुंडे, व्यंकट पाटील, मानसिंग ठाकूर यांच्यासह तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 
Top