उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  आम्ही शेतकऱ्यांची मुल आहोत असे सांगून वर्षानुवर्ष  सत्तेची  ऊब घेणाऱ्या आमदारांनी साठ वर्षावरील वृद्ध शेतकऱ्यांना प्रति महिना 5000 रु. पेन्शन देण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठराव मांडण्याचे आवाहन जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केले आहे.

   शेतकऱ्यांची अवस्था जाणून आज देशातील उत्तर प्रदेश ,केरळ ,कर्नाटक, पंजाब ,तामिळनाडू ,पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम या राज्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे .आयुष्यभर काबाडकष्ट करून देशातील नागरिकांना जगविणाऱ्या बळीराजाला पेन्शन देण्यास आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने चालढकल केली आहे. देशातील शेतकरी सोडून इतर कोणताही घटक आत्महतेकडे वळलेला नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना प्रति महिना 5000 रु.पेन्शन देऊन आपण  शेतकऱ्यांच्या हितालाही प्राधान्य देत असल्याचे दाखवून द्यावे असे स्पष्ट मत अॅड भोसले व्यक्त केले आहे.


 
Top