उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्या विधानसभेत बोलण्याची संधी िमळत नाही हे आपण टिव्हीवर पाहता त्यामुळे विधानसभेत बोलण्याची संधी िमळाल्यास उस्मानाबाद शहरतील विकास कामावर आणलेली स्थगिती हा मुद्दा माडणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे अामदार कैलास पाटील यांनी बोलताना दिली. 

गेल्या चार दिवसापासून उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केले आहे. गुरव यांच्यासोबत रवी वाघमारे, पंकज पाटील, अजय नाईकवाडी हे बसले आहेत. पत्रकारांशी बोलताना अामदार कैलास पाटील यांनी निविदा प्रक्रिया न उघडता निवदा प्रक्रियामध्ये अनियमितता  झाली आहे, असा शोध लावला आहे. केवळ शहरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळु नये एवढयासाठीच विकास कामावर स्थगिती आणल्याचे सांगितले. हे विकास कामे मार्च पर्यंत केले नाही तर त्यासाठी आलेला निधी अखर्चीत राहून शहराचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. 

सोमनाथ गुरव

सोमनाथ गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री हे पालकमंत्री राहिले नसून मालक मंत्री झाले आहेत. १४ ऑक्टोबर २०२२ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ३१ ऑक्टोबरच्या आत कार्यारंभ आदेश द्या, असे सांगितले असताना पालकमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी रेड्डी यांनी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी कामाता अनियमितता झाल्याबद्दल मंजूर कामांना स्थगितीचे पत्र काढले आहे. हे स्थिगितीचे पत्र पुर्वगृह दुषित असल्याची िटका ही गुरव यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तांत्रिक बीड उघडण्यात आले नसताना निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली हे अगोदरच कसे कळाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी ४३ दिवसांनी  विकास कामांना स्थगिती देण्याचे प्रत्र काढले आहे. यावरून राजकीय सुडबुध्दीने विकास कामांची आडवणुक केली जात असल्याची िटका ही गुरव यांनी केली. 

 
Top