उमरगा/ प्रतिनिधी : - 

शिक्षणा मुळेच व्यक्तीमत्व विकास होतो. शिक्षणा मुळे समाज प्रबोधना साठी साहित्य निर्मिती करणे शक्य होते. जगणं सुंदर करायचे असेल तर साहित्य निर्मिती करा. सुंदर साहित्य निर्मिती मुळे जगणं सुंदर होतं. आपल्या कडे कांहीही नसल्याचे दुःख चघळत बसण्या पेक्षा आल्या कडे असलेल्या उत्कृष्ट कर्तत्वाचा उत्सव दररोज साजरा करा असे प्रतिपादन अहमदपूर येथील जेष्ठ साहित्यीक तथा विचारवंत मोहीब कादरी यांनी येथे केले.

उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा जेष्ठ साहित्यीक भाऊराव सोमवंशी यांनी लिहिलेल्या “ गतीमान शिक्षणातून समाज प्रबोधन “ या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात साहित्यीक मोहिब कादरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी “ वळंबाकार “ जेष्ठ साहित्यीक शिवमूर्ती भांडेकर होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रा. किरण सगर , उमरगा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, सुभाष वैरागकर, प्राचार्य सोमशंकर महाजन, प्रा. प्रभाकर कांबळे, उपप्राचार्या संद्या सगर , प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य भीमाशंकर सारणे, कमलाकर भोसले ,ललीता सोमवंशी सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना कादरी म्हणाले कि - जगणं सुंदर आहे. अभिमानान जगता आलं पाहिजे. कष्टातून मिळविलेल्या संपत्ती साहित्यातून उभारलेली संपत्ती कधीही श्रेष्ठ असते. साहित्य निर्मिती हा समाज मनाचा आरसा आहे. उत्कृष्ट साहित्य निर्मिती करुन उत्कृष्ट समाज निर्मिती करा असे आवाहन कादरी यांनी केले.

या वेळी सुभाष वैरागकर , प्रा. किरण सगर यांची भाषणे झाली. उत्कृष्ट प्रवृत्तीतूनच उत्कृष्ट प्रकृती लाभते. असे सांगताना प्राचार्य डॉ. दिलीप गरूड म्हणाले कि - बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या उंबरठ्यावर भाऊराव सोमवंशी यांनी “ गतीमान शिक्षणातून समाज प्रबोधन “ या साहित्य कृतीची निर्मिती केली आहे. त्यांचे हे साहित्य नवीन शैक्षणिक धोरणा करिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणा मुळे ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण होणार आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडी प्रमाणे       मुक्त शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे. नक्कीच बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या उंबरठ्यावर सोमवंशी यांची साहित्य कृति सामाजिक परिवर्तन घडवेल असा आत्मविश्वास डॉ. गरूड यांनी व्यक्त केला. सोमवंशी यांची साहित्य कृती प्रज्ञा , शिल , करुणा या तत्वावर आधारीत आहे. माणसा माणसांच्या मनामना मधील वाढत जाणारे अंतर कमी करणारी साहित्य निर्मिती सोमवंशी यांनी केली आहे. साहित्य हे सामाजिक संशोधनाचे साधन असल्याने वाचनसंस्कृति वाढवून साहित्य निर्मितीची जपणूक करा असे साहित्यीक भांडेकर म्हणाले .

प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले .सुत्रसंचालन प्रा.लक्ष्मण बिराजदार यांनी केले. आभार प्रा.डॉ. बालाजी मोरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येनि उपस्थित होते.


 
Top