उमरगा/ प्रतिनिधी - 

अतिवृष्टी, गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचें पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेनेच्या वतीने  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदाराणा दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,मागील दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी शेतकऱ्यांना बोगस खतबियाणे आणि यावर्षी तर शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी प्रचंड नुकसान झालेले आहे सततचा होणारा पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली त्यात निसर्गाचा भडीमार त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी लवकरात लवकर मदत करावी उमरगा तालुक्यातील शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी असे म्हटले आहे .

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे,उप तालुकाप्रमुख सुधाकर पाटील शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी,  युवासेना शहर प्रमुख अमर शिंदे, जाहिद मुल्ला, दत्ता डोंगरे,आप्पाराव गायकवाड, श्रीकांत पतंगे, विधानसभा संघटक शरद पवार, योगेश तपसाळे,संतोष सगर,गजानन सूर्यवंशी, दत्ताभाऊ शिंदे, शंकर सूर्यवंशी, लिंगराज स्वामी, अमित माने, भीमाशंकर गायकवाड, सलीम हन्नूरे,  प्रसाद गायकवाड, नागेश मंडले ,युवराज गायकवाड मिथुन हेबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते 

 
Top