उस्मानाबाद /प्रतिनिधी -

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे,2019 साली अशाचप्रकारे कोल्हापुर सांगली येथे नुकसान झाले होते, तेव्हा कोरडवाहु पिकांना 20 हजार 400 रुपयाची मदत देऊन तिथ पिककर्ज माफ केले होते.मग मराठवाडा व विदर्भानी कोणत पाप केले आहे असा सवाल आमदार कैलास घाडगे पाटील यानी सरकारला केला.कृषीमंत्री मराठवाड्यातील तर उपमुख्यमंत्री विदर्भाचे असुनही शेतकऱ्यांना मदतीबाबत दुजाभाव केला जात असल्याचे घाडगे पाटील यानी म्हटले आहे. 

विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावर आमदार पाटील यानी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आमदार पाटील म्हणाले की,जाहीर केलेली मदत व 2019 रोजी कोल्हापुर सांगली जिल्ह्यातील मदत यामध्ये मोठा फरक आहे.मराठवाडा व विदर्भावरच असा अन्याय का?अस प्रश्न त्यानी केला. सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी दिसत नसली तरी सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे.सोयाबीन पिक पुर्णतःवाया गेले आहे,त्यामुळे सरसकट सोयाबीनचे पंचनामे करण्याची मागणी आमदार पाटील यानी केली.गोगलगाईमुळे उस्मानाबाद,बीड व लातुर जिल्ह्यातील नुकसान झाले आहे. किडीसाठी फक्त साडेसातशे रुपये दिले जातात.त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाले आहे.यावर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक नावाच्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे,या विषाणुमुळे पिक पिवळे पडते,त्याला शेंगा लागत नाहीत,शेंगा लागल्या तर त्यात दाणे भरत नाही.त्यामुळे याने देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बोंडअळी लागल्यावर कापसाला मदत केली होती, त्याप्रमाणे या यलो मोझॅकचा समावेश करुन तशी मदत दिली पाहिजे अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.जमीन खरडुन गेल्यानंतर एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषानुसार बहुभुधारकाना मदत मिळत नाही, त्यात किमान दोन हेक्टरपर्यंत च्या शेतकऱ्यांचा समावेश करुन मदत करणे आवश्यक असल्याचे मत आमदार घाडगे पाटील यानी व्यक्त केले.याशिवाय शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुर देखील पशुधनाचा सांभाळ करतात पण त्याना नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवीतहानी झाल्यास कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही.हे निकष देखील बदलुन शेतमजुरांचाही समावेश करण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यानी यावेळी केली.

 
Top