उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांनी उस्मानाबाद येथे महाविद्यालय स्थापन करून येथील तरूणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने आज उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षणाची जागरूकता झाली.या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेञात कार्य करत आहेत आजच्या विद्यार्थ्यांनी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या जयंती दिनी त्यांचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन विश्वास आप्पा शिंदे यांनी 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्यक,संस्थापक,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या  १०४ वी जयंती निमित्त ९जून रोजी,प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना केले आहे.प्रारंभी मान्यवरांनी डाॅ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पूजन केले.सदर कार्यक्रम प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड (मराठी विभाग प्रमुख) म्हणाले की,डाॅ.बापूजी साळुंखे यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छोटे रोपटे लावले होते त्यांनी बहुजन समाजातील माणसांना शिक्षण देऊन सक्षम केले ताज संस्थेचा विशाल वटवृक्ष झाला आहे.आजच्या शिक्षकांनी डाॅ.बापूजी साळुंखे यांचा त्याग स्मरून कार्य करावे.अध्यक्षीय समारोप करताना  प्रभारी प्राचार्य प्रा. डी.एम  शिंदे म्हणाले की,डाॅ.बापूजी साळुंखे एक ज्ञानतपस्वी होते राज्याच्या क्षैक्षणिक क्षेञात त्यांचे योगदान आहे.बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांनी सक्षम बनवले आहे.त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. केशव क्षीरसागर यांंनी केले  

डाॅ.बापूजी साळुंखे यांची जयंती महाविद्यालयातील परिसर स्वच्छ,करून करण्यात आली यावेळी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक यांनी श्रमदान केले.आभार प्रा.डाॅ.नितीन गायकवाड यांनी मानले


 
Top