उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

घडलेली घटना दुर्दैवी आहे.आपण काही चिंता करू नका,आम्ही आपल्या सोबत आहोत. अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गंभीरे परिवाराचे सांत्वन केले.

कळंब तालुक्यातील  ईटकुर (जिल्हा उस्मानाबाद) येथील तरूण शेतकरी अविनाश गंभीरे यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज वसुली तगद्यामुळे व मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्यानंतर सदर माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांना समजताच त्यांनी बाळ नांदगावकर यांचे मार्फत उस्मानाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कपाट यांच्याशी संवाद साधला आणि गंभीरे यांची भेट घेऊन त्यांना जे काही मदत करता येईल या दृष्टीने पहावे असे सांगितले.

त्यानुसार  मनसे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट, मनसे तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख  ईटकुर येथील अविनाश गंभीरे यांच्या घरी दाखल झाले. अविनाश गंभीरे यांच्या छोट्या भावासोबत बाळा नांदगावकर यांनी संवाद साधला आणि हकीकत ऐकून घेतली. अविनाश गंभीरे यांची थोरली कन्या एम बी बी एस चे शिक्षण घेत आहे याकरिता मनसे नेते बाळा नादगांवकर यांनी योग्य ती मदत करण्याची सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना केली. आपण काही चिंता करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत अशा शब्दात गंभीरे परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी मनसे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र गपाट, मनसे उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख, मनसे राज्य विज कामगार सचिव विशाल काबंळे साहेब, मनसे धाराशिव शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, मनसे कळंब तालुका सचिव गोपाळ घोगरे, मनसे वाशी तालुका ऊप अध्यक्ष विक्रम गपाट, व ईटकुर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top