उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी १६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या बँकेत १५ संचालक निवडून येणार असून सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला सोडून केवळ आर्थिकदृष्ट्या मृतावस्थेत असलेल्या जिल्हा बँकेला ऊर्जीतास्थेत आणण्यासाठी व तिचे गेलेले गतवैभव मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत या बँकेची निवडणुक प्रक्रीया बिनविरोध व्हावी व त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. यासाठी आपण ९५ टक्के प्रयत्न यशस्वी करीत आणले आहेत फक्त ५ टक्के प्रयत्नासाठी माध्यमांनी प्रयत्न करवेत, आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आ.प्रा.तानाजी सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.८ फेब्रुवारी रोजी केले.
शिंगोली येथील सर्कीट व्हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अा.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता साळुंखे, िज.प.उपाध्यक्ष धनाजी सावंत, प्रशांत चेडे, संजय गाढवे, माजी अा.ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले की, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक होती. मात्र आज या बँकेत ज्या शेतकरी, सभासद यांनी डिपॉझीट ठेवले त्या ठेवी देखील परत देऊ शकत नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी निवडणुक लढविताना किमान त्या शेतकऱ्यांचा ठेवीदारांचा विचार करून बँकेला चांगले दिवस आणण्याचे दिवास्वप्न दाखवून निवडणुक लढत आहेत. ते केंव्हाही वास्तवात उतरू शकत नसल्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अर्ज माघार घेण्यास सांगून ही निवडणूक कोणत्याही परिस्थित बिनविरोध होईल यासाठीच प्रयत्न करावेत, इतर जिल्हा बँका शून्य टक्के व्याजाने कर्ज शेतकऱ्यांना देतात. आपण ही जिल्हयातील शेतकऱ्यांना अशा पध्दतीचे कर्ज उपलब्ध करून देऊ यासाठी उद्दिष्ट ठेवून ही बँक पुन्हा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करू, विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांची पगार करण्यासाठी या बँकेत पैसे उपलब्ध होत नाहीत, याचे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तसेच ज्यांना बँकींग क्षेत्राचा व अकाऊंट माहित असलेल्या लोकांनी निवडण्ूक लढविली तर ते योग्य वाटेल. मरणास्थेत असलेल्या बँकेच्या संचालकांनी विकासाचा स्त्रोत उभा करायचा असेल तर कुटीर उद्योग चालले पाहिजेत, त्यासाठी तुळजाभवानी व तेरणा कारखाना देखील चालने गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले. विकासात अडथळा झाला पाहिजे, यासाठी कांहीजण प्रयत्न करतात त्यामुळे जिल्हयाचे मागासलेपण कसे दुर होईल यासाठी राजकारण विरीत सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घातलातर जिल्हयाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची ताकद आहे. ही बँक बिनविरोध करून नवीन मॉडेल व रोल करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहजे, मात्र मढयाच्या कडेला बसून पोळ्या खान्यात कांही उपयोग नाही, असे ही त्यांनी ठणकाहून सांगितले.
नेत्यांचे कौंन्सलींग करा
उस्मानाबाद जिल्हा बैंक बिनविरोध निघण्यासाठी राजकारण बाजूला ठेवत सर्व पक्षांच्या नेत्यांचे कॉन्सलींग होणे महत्वाचे आहे,असे मत आमदार तानाजी सावंतयांनी मांडून ही बँक बिनविरोध निघाली तर या बँकेला पुन्हा पुर्वीचे गतवैभव देऊ. तेरणा कारखाना जर सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आमच्याकडे आला तर या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळपासाठी येऊन पुन्हा धुर निघेल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याबरोबरच दोन्ही संस्थांना पुन्हा गतवैभव देऊन फुलविणार असून जिल्हयावासियांना सुवर्ण दिवस येतील,असे आश्वासन तानाजी सावंत यांनी दिले.