उस्मानाबाद / प्रतिनिधी-महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्राह्मणवाद्यांचा पगडा असलेला समाज आहे, ओबीसी समाजाचा संघर्षाचा कोणताही इतिहास नाही त्यामुळे माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे.मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी व आपण त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागून घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन करेल इसा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. 

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.खंडेराव चौरे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मामा मंजुळे, लक्ष्मण माने, पांडुरंग लाटे गुरुजीभाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत हापटे भातंब्री चे उपसरपंच रवि बंडगर, नगरसेवक दाजी अप्पा पवार, ओबीसी मोर्चा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष क्षीरसागर वैभव हांचाटे, बबन सोनवणे, निखिल अल्कुंटे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

 
Top