उस्मानाबाद / प्रतिनिधी-
ऐन दिवाळीच्या धामधुमीत रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी किसली पुर्व सूचना न देता उस्मानाबादेतील बहुतांश भागांत तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीमुळे दुकानदारांसह ग्राहक परेशान झाल्याचे पहावयास मिळाले. कुठल्याही सूचनेशिवाय वीज गायब होण्याचे प्रमाण नेहमीचेच झाले आहे. शिवाय थकीत वीज बीला अभावी पुरवठा खंडित करण्याची मोहीमही जोरदार राबवली गेली आहे.